"हाय अर्जुन, काल तु दिलेला टेडी मला खुप आवडला, अगदी तुझ्या सारखाच आहे, नुसता माझ्याकडे बघत असतो, काहीच बोलत नाही, मी रात्रभर त्याच्याशी गप्पा मारत होते," असं स्वराली बोलली. अर्जुनही जरा लाजतच बोलला, "चल मग आज आपण गप्पा मारतच जाऊ तुझ्या, क्लास पर्यंत." मग ते दोघं एकमेकांबरोबर क्लासकडे निघाले. रस्त्यानं जाता जाता अर्जुनंला रस्त्याच्या लगतची काही रानफुलं दिसली, त्यांच्यावर पडलेल्या दवबिंदुंमुळे ते फुलं गुलाबांच्या फुलां इतकीच सुंदर दिसत होती. त्याच्यातलं एक फुल त्यानं तोडलं, त्याच्यारच्या दवबिंदुचा एक थेंब त्यानं बोटावर घेतला. "निसर्ग सुंदर किमयागार आहे ना अर्जुन?" असं ती अर्जुनला बोलली. "हो ना, ह्या दवबिंदुलाच बघ ना, अगदी मोत्यासारखाच वाटतोयं ना? पण जरा अजुन उन पडलं की ह्याचं अस्तित्व नाहीसं होईल, आणि पुन्हा सकाळी परत आज सारखं सौंदर्यं याच्या वाट्याला येईल." अर्जुन आणि स्वरालीचा असा संवाद सुरुच होता, बोलण्याच्या नादात स्वरालीला क्लासला जाण्याचं लक्षातच राहिलं नाही. ते दोघं एकमेकांशी बोलत चालले असतांना, त्यांना समोरुन अचानक मैथिली येतांना दिसली. त्या दोघांना बघताच मैथिलीनं स्कुटी थांबवली, "स्वराली, घरी चल पटकन तुझ्या, तुझ्या आजीची तब्येत अचानक खुप बिघडली आहे, इतक्यात क्लासवर फोन आला होता." मैथिली असं बोलल्या-बोलल्या स्वराली रडायला लागली.
"मैथिली तु स्वरालीला घेऊन जा पटकन, मी पोहतोच तुमच्या माघनं." असं अर्जुन स्वरालीला धीर देत बोलला. मैथिली आणि स्वराली घरी पोहचल्याच तोच, तिला तिची आई रडतांना दिसली. "आई, आजीला कायं झालं गं?" असं खांद्यावरचं दप्तर बाजुला टाकतं स्वरालीनं रडक्या स्वरातच चिचारलं, आईनं फक्त बोटानं आजीच्या खोलीकडे इशारा केला. स्वराली धावतच आजीच्या खोलीत गेली, आपल्या पलंगावर आजी एकदम निचपत पडली होती, स्वरालीचे बाबा अगदी लहानमुलासारखे रडतं होते, आजीला तपासत असलेल्या डॉक्टरांनी, "सॉरी मराठे साहेब, शी इज नो मोअर", असं खाली मान घालुन सांगितलं, "आशु, असं कसं काय झालं गं, कालच स्वराचा वाढदिवस झाला, किती खुष होती आई," असं म्हणतं स्वरालीच्या बाबांनी हंबरडा फोडला, आणि स्वराली पन, "आजी" असं म्हणतं रडायला लागली.
हार्ट ऍटॅक आल्याने स्वरालीच्या आजीचं दुखःद निधन झालं होतं. थोड्याच वेळात अर्जुन तिथं पोहचला. स्वराली, तिची आई आणि बाबा रडतं होते, अर्जुनला बघताच स्वरालीची आई बोलली, "शेवटच्या क्षणी माईंना तुला आणि स्वरालीला बघायची ईच्छा होती रे, माझी बाहुली कुठेयं रे बच्चा.. बाहुली ये ना गं, तुला राजकुमाराची गोष्ट सांगायची आहे, असं म्हणतचं त्यांनी अखेरचा श्वास घेतला." आणि स्वरालीच्या आई पदराआड तोंड लपवुन रडु लागली. अर्जुन आत मध्ये आला, आतल्या खोलीत आजीच्या डोक्याजवळ बसुन रडणारी स्वरालीला बघितल्यावर त्याच्याही डोळ्यांत आसवं आले. अर्जुनला बघताच, स्वराली ओक्साबोक्शी रडु लागली. "अर्जुन आजीला सांग ना रे, माझ्याशी बोलायला, बघं ना माझ्याकडे बघतचं नाहीऐ, आजी, तुझी बाहुली रडतेयं गं, उठं ना आजी, मला राजकुमाराची गोष्ट सांग ना आजी, आजी मी काढलेलं इंद्रधनुष्याचं चित्र बघं ना आजी, बाबा सांगाना आजीला काहीतरी,"
थोड्यावेळानं स्वरालीचे सर्व नातेवाईक जमले, आजीनं देहदान करायचं ठरवलेलं होतं, आईच्या ईच्छेनुसार मग त्यांचा देह दान करण्यात आला. आज आपण स्वरालीबरोबर रस्त्यानं बोलत चाललो नसतो तर कदाचित स्वरालीला तिच्या आजीच्या शेचटच्या क्षणाला त्यांच्या सोबत असु शकली असती, या विचारानं अर्जुन अजुनच दुखी: झाला. स्वरालीची दशा त्याला बघवली जात नव्हती. तिच्या आईपेक्षाही आजीमध्ये तिचा जास्त जीव होता. रडुन रडुन स्वराली एकदम कोमेजलेल्या फुलासारखी झाली होती. तिच्या डोळ्यांतली आसवं आटली होती, पण हुंदके सुरुच होते. स्वरालीच्या आजीचं अस आकस्मिक निधन एकदम वाईट स्वप्नासारखं तिच्या कुटुंबाला वाटत होतं, आदल्या रात्री आपल्या लाडक्या नातीचा वाढदिवस म्हणुन आजी खुप उत्साही होती. आपल्या बाहुलीचं मन त्यांना माहिती होतं, तिला आवडणार्या राजकुमाराच्या गोष्टीतला तिला हवाहवासा राजकुमार कोण होता हे फक्त आजीलाच ठाऊक होतं, नदीच्या किनारी असलेलं इंद्रधनुष्य, त्याच्या जवळुन उडणार्या दोन पाखरं या स्वरालीच्या चित्राचा अर्थ फक्त आजीलाच उमजायचा. अर्जुनंने ज्या दिवशी तिला डायरी दिली होती, त्या दिवशी स्वरालीनं एका वाळवंटातल्या झाडाला पालवी फुटल्याचं चित्र काढलं होतं, ते बघतांना सगळ्यात जास्त आनंद आजीलाच झाला होता. लहानपणी फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तिला परी सारखं तयार करतांना "आजी मी मोठ्यापणी अशीच सुंदर दिसेल का गं?" असं विचारणार्या स्वरालीला आजीला शेवटच्या क्षणी परीच्याच रुपात बघायचं होतं.
आजीचं निधन होऊन दहा दिवस उलटले होते, स्वरालीनं अन्न-पाण्याला स्पर्शही केला नव्हता, आजीच्या खोलीत लहानपणी आजीनं घेऊन दिलेल्या बाहुलीला जवळ घेऊन ती तशीच बसलेली असायची, "स्वरा, माझ्या बाळा, दोन घास खाऊन घे," असं तिच्या जवळ बसुन रडणार्या तिच्या आई-बाबांकडे तिचं लक्ष नसायची, "आजी-आजी" करत असलेली स्वरालीला बघितल्यावर त्यांच काळीज हेलावुन जायचं. तिची जीवलग मैत्रिण मैथिली तिला बोलतं करायचा प्रयत्न करायची, पण काहीच उपयोग होत नव्हता, स्वरालीला बघितल्यावर मैथिलीला देखील रडायला यायचं. "अर्जुन, बेटा स्वरालीची तब्येत खुप खराब झालीऐ रे, तव्या सारखं तिचं अंग तापलयं रे, डॉक्टरांनी इंजेक्शन्स दिलीत, पण ती काहीच खात-पितं नाही रे, चल ना माझ्याबरोबर." असं अर्जुनला सांगायला रात्री दिड वाजता स्वरालीचे बाबा आले. अर्जुन घाई-घाईनं स्वरालीच्या घरी आला. स्वरालीकडे बघुन त्याच्या डोळ्यातं पाणी आलं, तिच्या आईनं दिलेलं जेवणाचं ताट तो तिच्या जवळ घेऊन गेला.
"स्वराली, आजीसाठी तरी दोन घास खाउन घे गं." असं म्हणतांना त्याचा कंठ दाटुन आला, तरी स्वरालीनं त्याला काही प्रतिसाद दिला नाही. "बाहुली असं नको करु गं," असं म्हणतं अर्जुनने तिला घास भरवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनला बघताच स्वराली पुन्हा रडायला लागली. अर्जुनने तिला तिच्या हातानं जेवण भरवलं, अगदी तिच्या आजीसारखं, लहानपणी त्याला झोपवतांना त्याची आई म्हणायची तीच अंगाई म्हणत त्यानं तिला थापटवुन झोपवलं. रात्रभरं त्याचा हात तिच्या हातात तसाच होता. सकाळी औषधांचा परिणाम दिसु लागला. स्वरालीचा ताप उतरला होता, पण तिच्या मनाला लागलेल्या धक्क्यातनं ती अजुनही सावरली नव्हती. तिची बारावीची प्रॅक्टिकल्सची परिक्षा जवळ येत होती. स्वराली ना क्लासला जात होती, ना कॉलेजला नुसती घरात एकटीच रहात होती, आई-बाबांबरोबर खुपच कमी बोलत होती. तिच्या आईनं तिच्यासाठी महिनाभर रजा घेतली होती. अर्जुन रोज कॉलेजला जाण्याआधी तिला भेटुन जायचा. कॉलेजवरुन आल्यानंतर कितीतरी वेळ तो तिच्यासोबत असायचा. तिला हसवण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करत होता.
हळु हळु स्वराली स्वतःला सावरु लागली होती, हे बघुन तिच्या आई-बाबांना बरं वाटु लागलं होतं, तिला या धक्क्यातनं सावरायला सगळ्यात जास्त मदत झाली ती अर्जुनचीच. अर्जुनने तिला संपुर्ण लक्ष अभ्यासवर केंद्रित कराण्यासाठी मोलाची साथ दिली. त्यानं दिवसरात्र एक करुन तिच्यासाठी सगळ्या विषयांच्या नोट्स तयार केल्या. हल्ली त्याला स्वतःपेक्षा स्वरालीचीच चिंता जास्त असायची. "अगदी माईंसारखी माझ्या स्वराची काळजी करतोस रे अर्जुन तु..!" असं स्वरालीची आई बोलल्यावर अर्जुनला अनोखं समाधान मिळायचं. स्वरालीची प्रॅक्टिकल परिक्षा जवळ येऊन ठेपली होती. आणि अर्जुनच्या कॉलेजमध्येही गॅदरिंग आणि डेज सुरु व्हायला केवळ एकाच आठवड्याचा वेळ राहिला होता. त्याच्या ग्रुपच्या नाटकाची प्रॅक्टिस जोरात सुरु होती, अर्जुन प्रॅक्टिसला का येत नव्हता हे सगळ्या ग्रुपला माहिती होतं. एकेदिवशी कॉलेज झाल्यानंतर त्याचा सगळा ग्रुप त्याच्या घरी आला, तेजाली आणि शामलीने नाटकाची प्रॅक्टिस थोडावेळ बघण्यासाठी स्वरालीलापण बोलावुन घेतलं. त्यादिवशी सगळया ग्रुपनं न चुकता सगळं नाटक सादर केलं, स्वराली खुप खुष झाली होती. तीनं सगळ्यांना गॅदरिंगसाठी शुभेच्छा दिल्या. किती दिवसांनतर स्वरालीच्या चेहर्यावर हसु बघितल्यामुळे अर्जुनपण खुष झाला. "थँक्स दोस्तांनो, आज तुमच्यामुळेच स्वरालीच्या चेहर्यावर हसु आलं, जे मला एकट्याला जमलं नाही ते तुमच्यामुळे शक्य झालयं!" असं स्वराली गेल्यानंतर अर्जुन आपल्या ग्रुपला बोलला.." यंदाचा ड्रामा आपण खास अर्जुन आणि स्वरालीसाठीच करुया..!" असं नाटकाचा सर्वेसर्वा असलेला हर्षित बोलला. "ओ.के. डायरेक्टर.." असं बाकीचे एका सुरात बोलले.
नववर्ष सुरु झाल्यानंतर अर्जुनला त्याची डायरी फक्त दोनच दिवस लिहिता आली होती, नंतर त्याच्या डायरी लिहिण्यात खंड पडला, आज रात्री त्याला डायरी लिहावं असं वाटलं, आज त्यानं डायरी हातात घेतली, तिच्यावर टाकलेलं, "तुझ्या एकांतात सदैव मी..!" असं नाव त्याने खोडुन टाकलं. त्याजागी "तुझ्यासाठीच सर्वस्वी मी..!" असं नाव त्यानं टाकलं. स्वरालीने त्याला दिला होता तो पेन त्यानं जवळ घेतला. आणि त्याची डायरी लिहायला सुरुवात केली..
"आज १८ जानेवारी, गेल्या दहा वर्षांत जे घडलं नाही ते यंदा घडुन गेलं, आज डायरी लिहितांना मला एकांताची नाही तर स्वरालीची चिंता सतावते. किती निरागस आहे ती, बरं झालं तिला विधात्यानं माझ्यासारखं मन नाही दिलं. तिच्या आजीच्या अशा आक्समिक निधनाने तीच्याच कुटंबाला नाहीतर मलाही प्रचंड धकका बसलायं. "अरे आज माझ्या स्वरालीचा वाढदिवस आहे ना, तिच्यासाठी प्रार्थना करायला आले होते" असं आदल्यादिवशी उत्साहनं सांगणार्या तिच्या आजीबरोबर असं का झालं? माझंही कुटुंब देवीच्या दर्शनाला जातांना अपघातात ठार झालं, मला तर हल्ली कुणासाठी देवाकडे प्रार्थना करायलाही भिती वाटु लागलीये. स्वरालीच्या डोळ्यांत अश्रु बघितले की खरचं मन खुप हेलावुन जायचं, तिला यातनं सावरण्यासाठी मला जे जे शक्य होईल ते सगळं करायचा प्रयत्न नक्की केलाच पाहिजे. शिवाय तिचं बारावीचं वर्ष, या सगळ्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर मुळीच व्हायला नको.
बरं झालं आज सगळा ग्रुप घरी आला होता, तेजालीने स्वरालीला नाटकाची प्रॅक्टिस बघायला बोलवलं ते बरं झालं, तेवढचं तीचं मन हलकं झालं.! त्या दिवशी स्वरालीचे बाबा रात्री दिड वाजता घरी आल्यावर काळीज एकदम धस्स झालं, स्वराली कडे बघितल्यावर तिला जगण्याची ईच्छाच उरली नव्हती असं वाटतं होतं, तिच्या आई-बाबांनी तिला जेवु घालायचा किती प्रयत्न केला होता, पण तिनं मी भरवल्यानंतर जेवण केलं, तिला अंगाई म्हणुन झोपवतांना तिनं माझा हात घट्ट पकडला होता. अगदी लहान मुलं आपल्या आईचा हात पकडुन ठेवतं तसाचं..! तिची आजी म्हणायची ते अगदी खरचं आहे, स्वराली खरचं बाहुली सारखीच आहे. माझ्या या बाहुलीला खरचं यापुढे माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत आनंदी ठेवायचा प्रयत्न करण्यासाठी मला सदैव बळ मिळु दे, अगदी तिला तिच्या आजीच्या गोष्टींतला राजकुमार तिला मिळे पर्यंत.!"
"मैथिली तु स्वरालीला घेऊन जा पटकन, मी पोहतोच तुमच्या माघनं." असं अर्जुन स्वरालीला धीर देत बोलला. मैथिली आणि स्वराली घरी पोहचल्याच तोच, तिला तिची आई रडतांना दिसली. "आई, आजीला कायं झालं गं?" असं खांद्यावरचं दप्तर बाजुला टाकतं स्वरालीनं रडक्या स्वरातच चिचारलं, आईनं फक्त बोटानं आजीच्या खोलीकडे इशारा केला. स्वराली धावतच आजीच्या खोलीत गेली, आपल्या पलंगावर आजी एकदम निचपत पडली होती, स्वरालीचे बाबा अगदी लहानमुलासारखे रडतं होते, आजीला तपासत असलेल्या डॉक्टरांनी, "सॉरी मराठे साहेब, शी इज नो मोअर", असं खाली मान घालुन सांगितलं, "आशु, असं कसं काय झालं गं, कालच स्वराचा वाढदिवस झाला, किती खुष होती आई," असं म्हणतं स्वरालीच्या बाबांनी हंबरडा फोडला, आणि स्वराली पन, "आजी" असं म्हणतं रडायला लागली.
हार्ट ऍटॅक आल्याने स्वरालीच्या आजीचं दुखःद निधन झालं होतं. थोड्याच वेळात अर्जुन तिथं पोहचला. स्वराली, तिची आई आणि बाबा रडतं होते, अर्जुनला बघताच स्वरालीची आई बोलली, "शेवटच्या क्षणी माईंना तुला आणि स्वरालीला बघायची ईच्छा होती रे, माझी बाहुली कुठेयं रे बच्चा.. बाहुली ये ना गं, तुला राजकुमाराची गोष्ट सांगायची आहे, असं म्हणतचं त्यांनी अखेरचा श्वास घेतला." आणि स्वरालीच्या आई पदराआड तोंड लपवुन रडु लागली. अर्जुन आत मध्ये आला, आतल्या खोलीत आजीच्या डोक्याजवळ बसुन रडणारी स्वरालीला बघितल्यावर त्याच्याही डोळ्यांत आसवं आले. अर्जुनला बघताच, स्वराली ओक्साबोक्शी रडु लागली. "अर्जुन आजीला सांग ना रे, माझ्याशी बोलायला, बघं ना माझ्याकडे बघतचं नाहीऐ, आजी, तुझी बाहुली रडतेयं गं, उठं ना आजी, मला राजकुमाराची गोष्ट सांग ना आजी, आजी मी काढलेलं इंद्रधनुष्याचं चित्र बघं ना आजी, बाबा सांगाना आजीला काहीतरी,"
थोड्यावेळानं स्वरालीचे सर्व नातेवाईक जमले, आजीनं देहदान करायचं ठरवलेलं होतं, आईच्या ईच्छेनुसार मग त्यांचा देह दान करण्यात आला. आज आपण स्वरालीबरोबर रस्त्यानं बोलत चाललो नसतो तर कदाचित स्वरालीला तिच्या आजीच्या शेचटच्या क्षणाला त्यांच्या सोबत असु शकली असती, या विचारानं अर्जुन अजुनच दुखी: झाला. स्वरालीची दशा त्याला बघवली जात नव्हती. तिच्या आईपेक्षाही आजीमध्ये तिचा जास्त जीव होता. रडुन रडुन स्वराली एकदम कोमेजलेल्या फुलासारखी झाली होती. तिच्या डोळ्यांतली आसवं आटली होती, पण हुंदके सुरुच होते. स्वरालीच्या आजीचं अस आकस्मिक निधन एकदम वाईट स्वप्नासारखं तिच्या कुटुंबाला वाटत होतं, आदल्या रात्री आपल्या लाडक्या नातीचा वाढदिवस म्हणुन आजी खुप उत्साही होती. आपल्या बाहुलीचं मन त्यांना माहिती होतं, तिला आवडणार्या राजकुमाराच्या गोष्टीतला तिला हवाहवासा राजकुमार कोण होता हे फक्त आजीलाच ठाऊक होतं, नदीच्या किनारी असलेलं इंद्रधनुष्य, त्याच्या जवळुन उडणार्या दोन पाखरं या स्वरालीच्या चित्राचा अर्थ फक्त आजीलाच उमजायचा. अर्जुनंने ज्या दिवशी तिला डायरी दिली होती, त्या दिवशी स्वरालीनं एका वाळवंटातल्या झाडाला पालवी फुटल्याचं चित्र काढलं होतं, ते बघतांना सगळ्यात जास्त आनंद आजीलाच झाला होता. लहानपणी फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तिला परी सारखं तयार करतांना "आजी मी मोठ्यापणी अशीच सुंदर दिसेल का गं?" असं विचारणार्या स्वरालीला आजीला शेवटच्या क्षणी परीच्याच रुपात बघायचं होतं.
आजीचं निधन होऊन दहा दिवस उलटले होते, स्वरालीनं अन्न-पाण्याला स्पर्शही केला नव्हता, आजीच्या खोलीत लहानपणी आजीनं घेऊन दिलेल्या बाहुलीला जवळ घेऊन ती तशीच बसलेली असायची, "स्वरा, माझ्या बाळा, दोन घास खाऊन घे," असं तिच्या जवळ बसुन रडणार्या तिच्या आई-बाबांकडे तिचं लक्ष नसायची, "आजी-आजी" करत असलेली स्वरालीला बघितल्यावर त्यांच काळीज हेलावुन जायचं. तिची जीवलग मैत्रिण मैथिली तिला बोलतं करायचा प्रयत्न करायची, पण काहीच उपयोग होत नव्हता, स्वरालीला बघितल्यावर मैथिलीला देखील रडायला यायचं. "अर्जुन, बेटा स्वरालीची तब्येत खुप खराब झालीऐ रे, तव्या सारखं तिचं अंग तापलयं रे, डॉक्टरांनी इंजेक्शन्स दिलीत, पण ती काहीच खात-पितं नाही रे, चल ना माझ्याबरोबर." असं अर्जुनला सांगायला रात्री दिड वाजता स्वरालीचे बाबा आले. अर्जुन घाई-घाईनं स्वरालीच्या घरी आला. स्वरालीकडे बघुन त्याच्या डोळ्यातं पाणी आलं, तिच्या आईनं दिलेलं जेवणाचं ताट तो तिच्या जवळ घेऊन गेला.
"स्वराली, आजीसाठी तरी दोन घास खाउन घे गं." असं म्हणतांना त्याचा कंठ दाटुन आला, तरी स्वरालीनं त्याला काही प्रतिसाद दिला नाही. "बाहुली असं नको करु गं," असं म्हणतं अर्जुनने तिला घास भरवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनला बघताच स्वराली पुन्हा रडायला लागली. अर्जुनने तिला तिच्या हातानं जेवण भरवलं, अगदी तिच्या आजीसारखं, लहानपणी त्याला झोपवतांना त्याची आई म्हणायची तीच अंगाई म्हणत त्यानं तिला थापटवुन झोपवलं. रात्रभरं त्याचा हात तिच्या हातात तसाच होता. सकाळी औषधांचा परिणाम दिसु लागला. स्वरालीचा ताप उतरला होता, पण तिच्या मनाला लागलेल्या धक्क्यातनं ती अजुनही सावरली नव्हती. तिची बारावीची प्रॅक्टिकल्सची परिक्षा जवळ येत होती. स्वराली ना क्लासला जात होती, ना कॉलेजला नुसती घरात एकटीच रहात होती, आई-बाबांबरोबर खुपच कमी बोलत होती. तिच्या आईनं तिच्यासाठी महिनाभर रजा घेतली होती. अर्जुन रोज कॉलेजला जाण्याआधी तिला भेटुन जायचा. कॉलेजवरुन आल्यानंतर कितीतरी वेळ तो तिच्यासोबत असायचा. तिला हसवण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करत होता.
हळु हळु स्वराली स्वतःला सावरु लागली होती, हे बघुन तिच्या आई-बाबांना बरं वाटु लागलं होतं, तिला या धक्क्यातनं सावरायला सगळ्यात जास्त मदत झाली ती अर्जुनचीच. अर्जुनने तिला संपुर्ण लक्ष अभ्यासवर केंद्रित कराण्यासाठी मोलाची साथ दिली. त्यानं दिवसरात्र एक करुन तिच्यासाठी सगळ्या विषयांच्या नोट्स तयार केल्या. हल्ली त्याला स्वतःपेक्षा स्वरालीचीच चिंता जास्त असायची. "अगदी माईंसारखी माझ्या स्वराची काळजी करतोस रे अर्जुन तु..!" असं स्वरालीची आई बोलल्यावर अर्जुनला अनोखं समाधान मिळायचं. स्वरालीची प्रॅक्टिकल परिक्षा जवळ येऊन ठेपली होती. आणि अर्जुनच्या कॉलेजमध्येही गॅदरिंग आणि डेज सुरु व्हायला केवळ एकाच आठवड्याचा वेळ राहिला होता. त्याच्या ग्रुपच्या नाटकाची प्रॅक्टिस जोरात सुरु होती, अर्जुन प्रॅक्टिसला का येत नव्हता हे सगळ्या ग्रुपला माहिती होतं. एकेदिवशी कॉलेज झाल्यानंतर त्याचा सगळा ग्रुप त्याच्या घरी आला, तेजाली आणि शामलीने नाटकाची प्रॅक्टिस थोडावेळ बघण्यासाठी स्वरालीलापण बोलावुन घेतलं. त्यादिवशी सगळया ग्रुपनं न चुकता सगळं नाटक सादर केलं, स्वराली खुप खुष झाली होती. तीनं सगळ्यांना गॅदरिंगसाठी शुभेच्छा दिल्या. किती दिवसांनतर स्वरालीच्या चेहर्यावर हसु बघितल्यामुळे अर्जुनपण खुष झाला. "थँक्स दोस्तांनो, आज तुमच्यामुळेच स्वरालीच्या चेहर्यावर हसु आलं, जे मला एकट्याला जमलं नाही ते तुमच्यामुळे शक्य झालयं!" असं स्वराली गेल्यानंतर अर्जुन आपल्या ग्रुपला बोलला.." यंदाचा ड्रामा आपण खास अर्जुन आणि स्वरालीसाठीच करुया..!" असं नाटकाचा सर्वेसर्वा असलेला हर्षित बोलला. "ओ.के. डायरेक्टर.." असं बाकीचे एका सुरात बोलले.
नववर्ष सुरु झाल्यानंतर अर्जुनला त्याची डायरी फक्त दोनच दिवस लिहिता आली होती, नंतर त्याच्या डायरी लिहिण्यात खंड पडला, आज रात्री त्याला डायरी लिहावं असं वाटलं, आज त्यानं डायरी हातात घेतली, तिच्यावर टाकलेलं, "तुझ्या एकांतात सदैव मी..!" असं नाव त्याने खोडुन टाकलं. त्याजागी "तुझ्यासाठीच सर्वस्वी मी..!" असं नाव त्यानं टाकलं. स्वरालीने त्याला दिला होता तो पेन त्यानं जवळ घेतला. आणि त्याची डायरी लिहायला सुरुवात केली..
"आज १८ जानेवारी, गेल्या दहा वर्षांत जे घडलं नाही ते यंदा घडुन गेलं, आज डायरी लिहितांना मला एकांताची नाही तर स्वरालीची चिंता सतावते. किती निरागस आहे ती, बरं झालं तिला विधात्यानं माझ्यासारखं मन नाही दिलं. तिच्या आजीच्या अशा आक्समिक निधनाने तीच्याच कुटंबाला नाहीतर मलाही प्रचंड धकका बसलायं. "अरे आज माझ्या स्वरालीचा वाढदिवस आहे ना, तिच्यासाठी प्रार्थना करायला आले होते" असं आदल्यादिवशी उत्साहनं सांगणार्या तिच्या आजीबरोबर असं का झालं? माझंही कुटुंब देवीच्या दर्शनाला जातांना अपघातात ठार झालं, मला तर हल्ली कुणासाठी देवाकडे प्रार्थना करायलाही भिती वाटु लागलीये. स्वरालीच्या डोळ्यांत अश्रु बघितले की खरचं मन खुप हेलावुन जायचं, तिला यातनं सावरण्यासाठी मला जे जे शक्य होईल ते सगळं करायचा प्रयत्न नक्की केलाच पाहिजे. शिवाय तिचं बारावीचं वर्ष, या सगळ्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर मुळीच व्हायला नको.
बरं झालं आज सगळा ग्रुप घरी आला होता, तेजालीने स्वरालीला नाटकाची प्रॅक्टिस बघायला बोलवलं ते बरं झालं, तेवढचं तीचं मन हलकं झालं.! त्या दिवशी स्वरालीचे बाबा रात्री दिड वाजता घरी आल्यावर काळीज एकदम धस्स झालं, स्वराली कडे बघितल्यावर तिला जगण्याची ईच्छाच उरली नव्हती असं वाटतं होतं, तिच्या आई-बाबांनी तिला जेवु घालायचा किती प्रयत्न केला होता, पण तिनं मी भरवल्यानंतर जेवण केलं, तिला अंगाई म्हणुन झोपवतांना तिनं माझा हात घट्ट पकडला होता. अगदी लहान मुलं आपल्या आईचा हात पकडुन ठेवतं तसाचं..! तिची आजी म्हणायची ते अगदी खरचं आहे, स्वराली खरचं बाहुली सारखीच आहे. माझ्या या बाहुलीला खरचं यापुढे माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत आनंदी ठेवायचा प्रयत्न करण्यासाठी मला सदैव बळ मिळु दे, अगदी तिला तिच्या आजीच्या गोष्टींतला राजकुमार तिला मिळे पर्यंत.!"
No comments:
Post a Comment