डायरी लिहिल्यानंतर अर्जुन थोडावेळ तसाच पडुन राहिला, नंतर उद्या असणार्या बॉक्सिंगच्या मॅचची त्याला आठवण झाली. सुमारे तीन आठवड्यांपासुन त्याची जिम आणि बॉक्सिंगची प्रॅक्टिस रखडली होती, आणि अशातच उद्या डायरेक्ट त्याला मॅचला उतरायचं होतं, तरी कसलचं टेंशन त्याला नव्हतं. त्याच्या गळ्यात असलेल्या बजरंगबलीच्या लॉकेट कडे त्यानं बघितलं. "महाभारतातल्या अर्जुनाच्या रथावर तुमचा झेंडा होता, म्हणुन अर्जुनाला हरवणं कुणाला जमलं नाही, माझ्या तर ह्रदयाच्या जवळ तुम्ही असल्यावर मला उद्याची चिंता नाही..!" असं स्वगत बोलत अर्जुन झोपी गेला. सुर्योदय होण्यापुर्वीच आज अर्जुन उठला होता, अंघोळ झाल्यानंतर त्यानं बजरंगबलीची पुजा केली. आपल्या दोन हातांकडे बघत तो बोलला, "आज जितक्या मॅचेस होतील, त्यावेळी प्रतिस्पर्धी हा माझा एकतर मित्रच असेल, किंवा माझा ज्युनियर, म्हणुन एकवेळ जिंकता आलं नाही तरी चालेल, पण ह्या हातांनी त्यांना कायमची इजा व्हायला नको."
अर्जुन एक अव्वल दर्जाचा बॉक्सर होता. त्याने पहिल्यांदा जेव्हा इंटरकॉलेज बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी तो सर्वांत तरुण स्पर्धक होता, त्याच्याकडे बघुन इतर स्पर्धक त्याला चिडवायला लागले, त्यानं पहिल्याच मॅच मध्ये प्रतिस्पर्ध्याला पहिल्याच राउंड मध्ये क्नॉक आऊट केलं होतं, त्यानं मारलेला ठोसा इतका जोरदार होता की प्रतिस्पर्धकाच्या उजव्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं होतं. त्या दोघांची ति मॅच त्याच्या ग्रुपमधल्या ज्यांनी बघितली त्यातिल तीन जणांनी त्याच्याशी मॅच आल्यावर त्याला बाय देणं पसंत केलं. अंतिम सामन्यातही त्याला अवघ्या दिड मिनिटांच विजयी घोषित केलं होतं..! त्याची मॅच झाल्यानंतर त्याचे कोच असलेले श्री. खान सर त्याच्यावर जाम खुष होते. त्यांनी त्याला बाहेरील स्पर्धा खेळण्याला सांगितलं, पण अर्जुन तयार नव्हता. त्याच्या पहिल्या प्रतिस्पर्धकाचा वेदनेनं भरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळायचा. "करियर किलर" असा टॅग त्या मॅचमुळे त्याला बाकीचे कॉलेजच्या मुलांनी दिला, तेव्हा अर्जुनला खुप वाईट वाटलं होतं. त्यामुळे नंतर फक्त्त हौस म्हणुन तो बॉक्सिंग शिकतच राहिला, पुढच्या वर्षी तो रिंग मध्ये उतरलाच नाही.
पण यंदा त्याला बॉक्सिंग मध्ये त्याच्या कोचच्या आग्रहामुळे उतरावं लागलं, ज्या वर्षी तो खेळला नाही, त्यावर्षी त्याच्या कॉलेजच्या प्रत्येक बॉक्सरला बाकीच्या बॉक्सरांनी पछाडलं होतं. अखिलाडुवृत्तीनं त्यावेळी कळसच गाठला होता. अशा ताकदीच्या गुर्मीत भरकटलेल्यांना खिलाडुवृत्तीनं खेळ कसा करायचा ते दाखवण्यासाठी अर्जुनला रिंग मध्ये उतरणं गरजेचं होतं. प्रचंड स्टॅमिना, कमालीची ताकद, आणि तंत्रशुद्ध बॉक्सिंग करण्यात अर्जुनला खान सरांनी पटाईत केलं होतं. त्यामुळे त्यांना अर्जुनकडुन एकच अपेक्षा होती, नुसत्या विजयाचीच नाही तर खिलाडुवृत्तीनं मिळवलेल्या विजयाची..! आपला विजयचं आज आपल्या गुरुसाठी गुरुदक्षिणा ठरावी, म्हणुन अर्जुन तयार झाला.
सोहम अर्जुनला घेण्यासाठी त्याच्या घरी आला. नंतर कॉलेजमध्ये आल्यावर अर्जुनने आपला मॅचचा लॉट बघितला. त्यानं पहिल्यावर्षी अंतिम सामन्यात ज्याला हरवलं, त्याच्याबरोबरच त्याची पहिली फाईट होती. "आज मजा येईल," असं आपले बॉक्सिंग ग्लोव्ह्ज हातात पकडतं अर्जुन बोलला. तितक्यात त्याचे कोच आले, त्यांना त्याने मनोभावे वंदन केलं. "काश अल्लाने मुझे तेरा अब्बाजान बनाया होता. बेटा शानसे खेलना. आज कोई भी मॅच मत हारना, गो फॉर विन माय "करियर किलर". असं खान सर त्याच्या पाठीवर हात ठेवतं बोलले. तोपर्यंत त्याचा सगळा ग्रुप आला होता. "वेलकम टु दि रिंग अर्जुन", "जस्ट कॉन्क इट.", "स्मॅक देम अप अर्जुन", "करियर किलर इज बॅक." "दि अनडिस्प्युटेड चॅंम्प इज हियर" "अर्जुन-दि अल्टिमेट राजपुत वॉरियर इज बॅक" "स्टुडंट्स चॅंम्प गो फॉर विन" असे रात्रभर जागुन त्याच्या मित्रांनी बॅनर्स बनवले होते. अर्जुनचा उत्साह त्यामुळे वाढला.
रिंग कडे जातांना त्याच्या कॉलेजची प्रत्येक मुलं त्याला चिअर करत होती. त्याच्या कॉलेजचा प्रत्येक जण आवर्जुन उपस्थित होता. बाकीच्या कॉलेजचे स्पर्धकही ती मॅच बघण्यासाठी जातीनं उपस्थित होते. रिंग मध्ये आल्यावर दोघ्या स्पर्धकांनी एकमेकांकडे एकदम खुन्नसने बघितलं. मागच्या वेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्याचा प्रतिस्पर्धी प्रताप काटकर खुप उतावीळ होता. त्याच्या डोळ्यांत जणु रक्त उतरलं इतका तो भयानक वाटत होता. त्यामाने अर्जुन थोडा शांत दिसत होता, अगदी झोपलेल्या सिंहासारखा. मॅचचा पहिला राऊंड सुरु झाला, प्रतापनं त्वेषानं एका-वर-एक पंचेस मारायला सुरुवात केली. त्यानं एक पंच अर्जुनच्या पोटात इतका जोरात मारला, त्यामुळे अर्जुन खाली कोसळला, अंपायरनं काऊंट करायला सुरुवात केली, सातव्या काउंटला अर्जुन पुन्हा अर्जुन उभा राहिला. "करियर किलर यु आर फिनिश." असं म्हणतं चवताळलेल्या प्रतापने पुन्हा जोरदार आक्रमण केलं. पहिला राऊंड अर्जुनने ५-० असा गमावला.
रिंगच्या बाजुला उपस्थित सगळं वातावरणं शांत होतं, खान सर अर्जुनला बोलले, "बेटा, क्या हो गया तेरे हाथोंको? ये वही छोकरा है जिसको तुने देड मिनिट मे आस्मान दिखा दिया था..!" "आजही तसंच होईलं" असं अर्जुन बोलला. दुसरा राऊंड सुरु झाला, अर्जुन उजव्या हाताचा बॉक्सर होता, पन अचानक त्याने डाव्या हातानं पंचेस सुरु केले. प्रताप त्यामुळे गोंधळला. त्याचा आक्रमक पवित्रा एकदम बचावात्मक झाला. अर्जुनने दोन मिनिटातच १२ पॉईंट्स मिळवले, पहिला राउंडला एकही गुण न मिळवता येणार्या अर्जुनने जणु सगळी बाजी फिरवुन टाकली. सगळं स्टेडियम पुन्हा अर्जुनला चिअर करु लागलं. "मेरा शेर जाग गया, अब तो ये गया.." असं नजरेनंच अर्जुनच्या कोचनं प्रतापच्या कोचला खुणवलं. दुसरा राउंडमध्ये अर्जुनला सात गुणांची मोठी आघाडी मिळाली. प्रतापनं मनातुन तिथंच नांगी टाकली, पण शेवटचा राऊंड खेळुयाचं असं त्यानं ठरवलं. तिसरा आणि शेवटचा राउंड सुरु झाला, प्रताप एक पॉईंट मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करु लागला. अर्जुनने त्याला अडिच मिनिटं नुसतं रिंगमध्ये दमवलं. आणि शेवटचे काही सेकंद बाकीच असतांना एक जोरदार पंच त्याला लगावला. प्रतापच्या डोळ्यांसमोर काजवंच चमकली. तो तिथंच पडला, आणि अर्जुने सामना जिंकला. "अरे आवाज कुणाचा, आमच्या करियर किलरचा.." "अरे बघतोस काय रागाने, बाजी मारली ढाण्या वाघाने..!" अशा आनंदाने मुलं आरोळ्या ठोकायला लागली. खान सर एकदम खुष झाले. पुढच्या दोन मॅचला अर्जुनला बाय मिळाला, आणि तो सरळ फायनल मध्ये पोहचला. एकाच दिवसात सगळ्या मॅचेस पार पडायच्या त्यामुळे प्रत्येक बॉक्सर थकलेला असायचा, खुद्द अर्जुनही. शेवटची फायनल मॅच पाच राउंड्सची ठेवण्यात आली.
खान सर अर्जुनला मॅचसाठी टिप्स देत होते, तितक्यात सोहम तिथं आला, त्याच्याबरोबर स्वरालीपण होती. तेजाली तिला घेऊन आली होती. स्वरालीला बघताच अर्जुन खुप खुष झाला. "खान सर, ये अपने अर्जुन की अच्छी दोस्त है.." असं सोहमने खान सरांना सांगितलं.. "बेटा, इधर बैठ जाओ, देखो कितना कमालका बॉक्सर है अपना अर्जुन." असं खान सरांनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत स्वरालीला सांगितलं. "तुझ्यासाठी तुझं लेडीलक पण सोबत आहे अर्जुन, बॉस आजची फायनल एकदम जबरदस्त झाली पाहिजे." असं सोहम अर्जुनला बोलला. "अर्जुनला करियर किलर असं का गं म्हणतात?" असं स्वरालीनं शेजारी बसलेल्या तेजालीला विचारलं. "अग बघ तु त्याची फाईट एकदा, कळेलच की तुला..!"असं तेजाली एकदम एक्साइट होऊन बोलली. फायनल मॅच सुरु झाली. अर्जुन आणि त्याचा प्रतिस्पर्धी गॅंथर डिसुजा समोरासमोर आले. गॅंथर यावेळी पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये उतरला होता. पण या खेळातला मुरलेला खेळाडु वाटतं होता. त्यानं त्याच्या सगळ्या फाईट्स पहिल्याच राऊंडमध्ये प्रतिस्पर्ध्याला क्नॉक आऊट करुन जिंकल्या होत्या. अर्जुन आणि त्याची नजर एकमेकांना भिडली, आपल्या छातीवर पंच मारत गॅंथर त्याच्याकडे बघुन बोलला, "अर्जुन राजपुत होप बेस्ट मॅन विन्स" अर्जुननेही त्याच्याकडे बघत सकारात्मक मान हलवली.
मॅच सुरु होण्याची बेल वाजताच गॅंथर चित्त्यासारख्या वेगानं अर्जुनवर झपटला. त्यानं त्याच्यावर धडा-धड पंचेसची बरसातच केली. अर्जुनेही आपला भक्कम बचाव केला आणि त्याला एकही पॉईंट मिळणार नाही याची खात्री घेतली. पहिल्या राउंडमध्ये एकाही बॉक्सरला एकसुद्धा गुण मिळाला नाही, आणि राउंड टाय झाला. गॅंथरने अर्जुनवर केलेल्या आक्रमक चालीमुळे अर्जुनला मार तर बसला होता, पण त्यानादात गॅंथरपण बराच दमला होता. ते दोघंही आता एकसारख्याच ताकदीचे वाटत होते. त्यादोघांना जोरदार चिअरिंग चालु होतं. "अर्जुनला किती मार बसतोय, तो का बरं त्याला मारत नाहीए?" असं स्वरालीच्या चेहर्यावर हावभाव होते. दुसरा राउंड सुरु होण्याआधी अर्जुनने तिच्याकडे बघितलं, "काळजी करु नकोस, मला काहीचं झालेलं नाही," असं त्याने डोळ्यानचं तिला खुणवलं. दुसरा राउंड सुरु होताच अर्जुने प्रतापच्या फाईटसारखीच डाव्या हातानं आक्रमन करण्यास सुरुवात केली. अर्जुनची ती फाईट बघितली असल्याने गॅंथर सावध होताच, पण अर्जुनला पॉईंट्स घेण्यापासुन रोखायचं कसं हेच त्याला उमजत नव्हतं. अर्जुनने तो राउंड ४-० असा जिंकला. तिसरा राउंडही अर्जुनने ५-४ असा जिंकला, चौथा राउंड जिंकल्यावर तो मॅचही जिंकणार होता, अपस्थित सर्व त्या दोघांची मॅच बघुन दंग झाले होते.
"इस राउंड के साथ अर्जुन मॅच भी जितले, उसे पंच उठाने का भी वक्त नही मिलना चाहिए.." असं म्हणतं खान सरांनी अर्जुनला प्रोस्ताहित करण्यासाठी म्हंटलं. चौथा राउंड सुरु झाला, बेल वाजताच गॅंथरने जोरदार आक्रमण करत अर्ध्या मिनिटांत तीन पॉईंट्स वसुल करुन मॅच मध्ये रंगत आणली. अर्जुनेही त्याच्या आक्रमणाला चोख उत्तर दिलं, पण चौथा राउंड संपायला थोडाच वेळ असतांना गॅंथरचा एक पंच अर्जुनच्या नाकाच्या एकदम जवळ बसला, त्याचा वार इतका जोरदार होता की, बसलेले सगळे उभे राहिले. अर्जुनला काही उमजायाच्या आत गॅथरने अजुन दोन पॉंईंट्स वसुल केले. चौथा राउंड संपला त्यावेळी दोघांचेही ९-९ असे समान गुण झाले होते. दोघेही बॉक्सर कमालीचे थकले होते, पण त्यांच्यातला कोणीच हार मानायला तयार नव्हता. सगळे जण फायनल मॅच च्या फायनल राउंडची श्वास रोखुन वाट बघु लागले, आणि तितक्यात शेवटचा राउंड सुरु झाल्याची बेल वाजली, पहिल्या राउंड पासुन आक्रमक खेळ करणार्या गॅंथरने बचावात्मक खेळ करायला सुरुवात केली.
एक छोटीशी चुक खुप महाग पडेल, म्हणुन ते दोघं खुप खबरदारी घेतं होते, दोन मिनिटं झाली, दोघांपैकी कुणीच चाल केली नाही, शेवटचा एक मिनिट बाकी असतांना शेवटी गॅंथरचा संयम सुटला. अर्जुनला अप्परकट करण्याच्या प्रयत्नात असतांनाच अर्जुनने त्याला जोरदार स्ट्रेट पंच केलं, गॅंथर खाली कोसळला. सगळे अर्जुनला चिअरअप करु लागले. अंपायरने काउंट सुरु केलं, त्याच्याबरोबर सगळे काउंट करु लागले. वन, टु, थ्रि, फोर, फाईव्ह, सिक्स, सेव्हन, एट, नाईन, टेन, असा काऊंट पुर्ण होताच सगळे जण धावत रिंगजवळ आले. अर्जुन फायनल मॅच जिंकला होता. हर्षितनं त्याला आपल्या खांद्यावर उचलुन घेतलं, खान सरांच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले, अर्जुन हर्षितच्या खांद्यावरुन उतरला, आणि स्वराली जवळ गेला. ती त्याच्याकडे बघुन हसली. तिचा हात पकडुन तो तिला रिंग मध्ये घेऊन गेला. गॅंथर तोपर्यंत तिथचं पडला होता. "थॅंक्स फॉर दि बेस्ट फाईट, यु डिझर्व दिस" असं गॅंथर अर्जुनला बोलला. अर्जुनेही त्याच्याशी हात मिळवला, आणि आपल्या खिलाडुवृत्तीचं दर्शन दिलं. त्यानं जिंकलेली ट्रॉफी त्यानं खान सरांच्या पायावर ठेवली. त्यांची छाती अभिमानानं फुलुन गेली. प्रत्येक जण त्याला विजयाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत होता. स्वराली अर्जुनचे ते कौतुक डोळे भरुन बघतं होती. कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर "पार्टी...पार्टी.." असं त्याचा ग्रुप त्याला म्हणु लागला. त्यानही आनंदाने पार्टी दिली.
अर्जुन एक अव्वल दर्जाचा बॉक्सर होता. त्याने पहिल्यांदा जेव्हा इंटरकॉलेज बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी तो सर्वांत तरुण स्पर्धक होता, त्याच्याकडे बघुन इतर स्पर्धक त्याला चिडवायला लागले, त्यानं पहिल्याच मॅच मध्ये प्रतिस्पर्ध्याला पहिल्याच राउंड मध्ये क्नॉक आऊट केलं होतं, त्यानं मारलेला ठोसा इतका जोरदार होता की प्रतिस्पर्धकाच्या उजव्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं होतं. त्या दोघांची ति मॅच त्याच्या ग्रुपमधल्या ज्यांनी बघितली त्यातिल तीन जणांनी त्याच्याशी मॅच आल्यावर त्याला बाय देणं पसंत केलं. अंतिम सामन्यातही त्याला अवघ्या दिड मिनिटांच विजयी घोषित केलं होतं..! त्याची मॅच झाल्यानंतर त्याचे कोच असलेले श्री. खान सर त्याच्यावर जाम खुष होते. त्यांनी त्याला बाहेरील स्पर्धा खेळण्याला सांगितलं, पण अर्जुन तयार नव्हता. त्याच्या पहिल्या प्रतिस्पर्धकाचा वेदनेनं भरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळायचा. "करियर किलर" असा टॅग त्या मॅचमुळे त्याला बाकीचे कॉलेजच्या मुलांनी दिला, तेव्हा अर्जुनला खुप वाईट वाटलं होतं. त्यामुळे नंतर फक्त्त हौस म्हणुन तो बॉक्सिंग शिकतच राहिला, पुढच्या वर्षी तो रिंग मध्ये उतरलाच नाही.
पण यंदा त्याला बॉक्सिंग मध्ये त्याच्या कोचच्या आग्रहामुळे उतरावं लागलं, ज्या वर्षी तो खेळला नाही, त्यावर्षी त्याच्या कॉलेजच्या प्रत्येक बॉक्सरला बाकीच्या बॉक्सरांनी पछाडलं होतं. अखिलाडुवृत्तीनं त्यावेळी कळसच गाठला होता. अशा ताकदीच्या गुर्मीत भरकटलेल्यांना खिलाडुवृत्तीनं खेळ कसा करायचा ते दाखवण्यासाठी अर्जुनला रिंग मध्ये उतरणं गरजेचं होतं. प्रचंड स्टॅमिना, कमालीची ताकद, आणि तंत्रशुद्ध बॉक्सिंग करण्यात अर्जुनला खान सरांनी पटाईत केलं होतं. त्यामुळे त्यांना अर्जुनकडुन एकच अपेक्षा होती, नुसत्या विजयाचीच नाही तर खिलाडुवृत्तीनं मिळवलेल्या विजयाची..! आपला विजयचं आज आपल्या गुरुसाठी गुरुदक्षिणा ठरावी, म्हणुन अर्जुन तयार झाला.
सोहम अर्जुनला घेण्यासाठी त्याच्या घरी आला. नंतर कॉलेजमध्ये आल्यावर अर्जुनने आपला मॅचचा लॉट बघितला. त्यानं पहिल्यावर्षी अंतिम सामन्यात ज्याला हरवलं, त्याच्याबरोबरच त्याची पहिली फाईट होती. "आज मजा येईल," असं आपले बॉक्सिंग ग्लोव्ह्ज हातात पकडतं अर्जुन बोलला. तितक्यात त्याचे कोच आले, त्यांना त्याने मनोभावे वंदन केलं. "काश अल्लाने मुझे तेरा अब्बाजान बनाया होता. बेटा शानसे खेलना. आज कोई भी मॅच मत हारना, गो फॉर विन माय "करियर किलर". असं खान सर त्याच्या पाठीवर हात ठेवतं बोलले. तोपर्यंत त्याचा सगळा ग्रुप आला होता. "वेलकम टु दि रिंग अर्जुन", "जस्ट कॉन्क इट.", "स्मॅक देम अप अर्जुन", "करियर किलर इज बॅक." "दि अनडिस्प्युटेड चॅंम्प इज हियर" "अर्जुन-दि अल्टिमेट राजपुत वॉरियर इज बॅक" "स्टुडंट्स चॅंम्प गो फॉर विन" असे रात्रभर जागुन त्याच्या मित्रांनी बॅनर्स बनवले होते. अर्जुनचा उत्साह त्यामुळे वाढला.
रिंग कडे जातांना त्याच्या कॉलेजची प्रत्येक मुलं त्याला चिअर करत होती. त्याच्या कॉलेजचा प्रत्येक जण आवर्जुन उपस्थित होता. बाकीच्या कॉलेजचे स्पर्धकही ती मॅच बघण्यासाठी जातीनं उपस्थित होते. रिंग मध्ये आल्यावर दोघ्या स्पर्धकांनी एकमेकांकडे एकदम खुन्नसने बघितलं. मागच्या वेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्याचा प्रतिस्पर्धी प्रताप काटकर खुप उतावीळ होता. त्याच्या डोळ्यांत जणु रक्त उतरलं इतका तो भयानक वाटत होता. त्यामाने अर्जुन थोडा शांत दिसत होता, अगदी झोपलेल्या सिंहासारखा. मॅचचा पहिला राऊंड सुरु झाला, प्रतापनं त्वेषानं एका-वर-एक पंचेस मारायला सुरुवात केली. त्यानं एक पंच अर्जुनच्या पोटात इतका जोरात मारला, त्यामुळे अर्जुन खाली कोसळला, अंपायरनं काऊंट करायला सुरुवात केली, सातव्या काउंटला अर्जुन पुन्हा अर्जुन उभा राहिला. "करियर किलर यु आर फिनिश." असं म्हणतं चवताळलेल्या प्रतापने पुन्हा जोरदार आक्रमण केलं. पहिला राऊंड अर्जुनने ५-० असा गमावला.
रिंगच्या बाजुला उपस्थित सगळं वातावरणं शांत होतं, खान सर अर्जुनला बोलले, "बेटा, क्या हो गया तेरे हाथोंको? ये वही छोकरा है जिसको तुने देड मिनिट मे आस्मान दिखा दिया था..!" "आजही तसंच होईलं" असं अर्जुन बोलला. दुसरा राऊंड सुरु झाला, अर्जुन उजव्या हाताचा बॉक्सर होता, पन अचानक त्याने डाव्या हातानं पंचेस सुरु केले. प्रताप त्यामुळे गोंधळला. त्याचा आक्रमक पवित्रा एकदम बचावात्मक झाला. अर्जुनने दोन मिनिटातच १२ पॉईंट्स मिळवले, पहिला राउंडला एकही गुण न मिळवता येणार्या अर्जुनने जणु सगळी बाजी फिरवुन टाकली. सगळं स्टेडियम पुन्हा अर्जुनला चिअर करु लागलं. "मेरा शेर जाग गया, अब तो ये गया.." असं नजरेनंच अर्जुनच्या कोचनं प्रतापच्या कोचला खुणवलं. दुसरा राउंडमध्ये अर्जुनला सात गुणांची मोठी आघाडी मिळाली. प्रतापनं मनातुन तिथंच नांगी टाकली, पण शेवटचा राऊंड खेळुयाचं असं त्यानं ठरवलं. तिसरा आणि शेवटचा राउंड सुरु झाला, प्रताप एक पॉईंट मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करु लागला. अर्जुनने त्याला अडिच मिनिटं नुसतं रिंगमध्ये दमवलं. आणि शेवटचे काही सेकंद बाकीच असतांना एक जोरदार पंच त्याला लगावला. प्रतापच्या डोळ्यांसमोर काजवंच चमकली. तो तिथंच पडला, आणि अर्जुने सामना जिंकला. "अरे आवाज कुणाचा, आमच्या करियर किलरचा.." "अरे बघतोस काय रागाने, बाजी मारली ढाण्या वाघाने..!" अशा आनंदाने मुलं आरोळ्या ठोकायला लागली. खान सर एकदम खुष झाले. पुढच्या दोन मॅचला अर्जुनला बाय मिळाला, आणि तो सरळ फायनल मध्ये पोहचला. एकाच दिवसात सगळ्या मॅचेस पार पडायच्या त्यामुळे प्रत्येक बॉक्सर थकलेला असायचा, खुद्द अर्जुनही. शेवटची फायनल मॅच पाच राउंड्सची ठेवण्यात आली.
खान सर अर्जुनला मॅचसाठी टिप्स देत होते, तितक्यात सोहम तिथं आला, त्याच्याबरोबर स्वरालीपण होती. तेजाली तिला घेऊन आली होती. स्वरालीला बघताच अर्जुन खुप खुष झाला. "खान सर, ये अपने अर्जुन की अच्छी दोस्त है.." असं सोहमने खान सरांना सांगितलं.. "बेटा, इधर बैठ जाओ, देखो कितना कमालका बॉक्सर है अपना अर्जुन." असं खान सरांनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत स्वरालीला सांगितलं. "तुझ्यासाठी तुझं लेडीलक पण सोबत आहे अर्जुन, बॉस आजची फायनल एकदम जबरदस्त झाली पाहिजे." असं सोहम अर्जुनला बोलला. "अर्जुनला करियर किलर असं का गं म्हणतात?" असं स्वरालीनं शेजारी बसलेल्या तेजालीला विचारलं. "अग बघ तु त्याची फाईट एकदा, कळेलच की तुला..!"असं तेजाली एकदम एक्साइट होऊन बोलली. फायनल मॅच सुरु झाली. अर्जुन आणि त्याचा प्रतिस्पर्धी गॅंथर डिसुजा समोरासमोर आले. गॅंथर यावेळी पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये उतरला होता. पण या खेळातला मुरलेला खेळाडु वाटतं होता. त्यानं त्याच्या सगळ्या फाईट्स पहिल्याच राऊंडमध्ये प्रतिस्पर्ध्याला क्नॉक आऊट करुन जिंकल्या होत्या. अर्जुन आणि त्याची नजर एकमेकांना भिडली, आपल्या छातीवर पंच मारत गॅंथर त्याच्याकडे बघुन बोलला, "अर्जुन राजपुत होप बेस्ट मॅन विन्स" अर्जुननेही त्याच्याकडे बघत सकारात्मक मान हलवली.
मॅच सुरु होण्याची बेल वाजताच गॅंथर चित्त्यासारख्या वेगानं अर्जुनवर झपटला. त्यानं त्याच्यावर धडा-धड पंचेसची बरसातच केली. अर्जुनेही आपला भक्कम बचाव केला आणि त्याला एकही पॉईंट मिळणार नाही याची खात्री घेतली. पहिल्या राउंडमध्ये एकाही बॉक्सरला एकसुद्धा गुण मिळाला नाही, आणि राउंड टाय झाला. गॅंथरने अर्जुनवर केलेल्या आक्रमक चालीमुळे अर्जुनला मार तर बसला होता, पण त्यानादात गॅंथरपण बराच दमला होता. ते दोघंही आता एकसारख्याच ताकदीचे वाटत होते. त्यादोघांना जोरदार चिअरिंग चालु होतं. "अर्जुनला किती मार बसतोय, तो का बरं त्याला मारत नाहीए?" असं स्वरालीच्या चेहर्यावर हावभाव होते. दुसरा राउंड सुरु होण्याआधी अर्जुनने तिच्याकडे बघितलं, "काळजी करु नकोस, मला काहीचं झालेलं नाही," असं त्याने डोळ्यानचं तिला खुणवलं. दुसरा राउंड सुरु होताच अर्जुने प्रतापच्या फाईटसारखीच डाव्या हातानं आक्रमन करण्यास सुरुवात केली. अर्जुनची ती फाईट बघितली असल्याने गॅंथर सावध होताच, पण अर्जुनला पॉईंट्स घेण्यापासुन रोखायचं कसं हेच त्याला उमजत नव्हतं. अर्जुनने तो राउंड ४-० असा जिंकला. तिसरा राउंडही अर्जुनने ५-४ असा जिंकला, चौथा राउंड जिंकल्यावर तो मॅचही जिंकणार होता, अपस्थित सर्व त्या दोघांची मॅच बघुन दंग झाले होते.
"इस राउंड के साथ अर्जुन मॅच भी जितले, उसे पंच उठाने का भी वक्त नही मिलना चाहिए.." असं म्हणतं खान सरांनी अर्जुनला प्रोस्ताहित करण्यासाठी म्हंटलं. चौथा राउंड सुरु झाला, बेल वाजताच गॅंथरने जोरदार आक्रमण करत अर्ध्या मिनिटांत तीन पॉईंट्स वसुल करुन मॅच मध्ये रंगत आणली. अर्जुनेही त्याच्या आक्रमणाला चोख उत्तर दिलं, पण चौथा राउंड संपायला थोडाच वेळ असतांना गॅंथरचा एक पंच अर्जुनच्या नाकाच्या एकदम जवळ बसला, त्याचा वार इतका जोरदार होता की, बसलेले सगळे उभे राहिले. अर्जुनला काही उमजायाच्या आत गॅथरने अजुन दोन पॉंईंट्स वसुल केले. चौथा राउंड संपला त्यावेळी दोघांचेही ९-९ असे समान गुण झाले होते. दोघेही बॉक्सर कमालीचे थकले होते, पण त्यांच्यातला कोणीच हार मानायला तयार नव्हता. सगळे जण फायनल मॅच च्या फायनल राउंडची श्वास रोखुन वाट बघु लागले, आणि तितक्यात शेवटचा राउंड सुरु झाल्याची बेल वाजली, पहिल्या राउंड पासुन आक्रमक खेळ करणार्या गॅंथरने बचावात्मक खेळ करायला सुरुवात केली.
एक छोटीशी चुक खुप महाग पडेल, म्हणुन ते दोघं खुप खबरदारी घेतं होते, दोन मिनिटं झाली, दोघांपैकी कुणीच चाल केली नाही, शेवटचा एक मिनिट बाकी असतांना शेवटी गॅंथरचा संयम सुटला. अर्जुनला अप्परकट करण्याच्या प्रयत्नात असतांनाच अर्जुनने त्याला जोरदार स्ट्रेट पंच केलं, गॅंथर खाली कोसळला. सगळे अर्जुनला चिअरअप करु लागले. अंपायरने काउंट सुरु केलं, त्याच्याबरोबर सगळे काउंट करु लागले. वन, टु, थ्रि, फोर, फाईव्ह, सिक्स, सेव्हन, एट, नाईन, टेन, असा काऊंट पुर्ण होताच सगळे जण धावत रिंगजवळ आले. अर्जुन फायनल मॅच जिंकला होता. हर्षितनं त्याला आपल्या खांद्यावर उचलुन घेतलं, खान सरांच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले, अर्जुन हर्षितच्या खांद्यावरुन उतरला, आणि स्वराली जवळ गेला. ती त्याच्याकडे बघुन हसली. तिचा हात पकडुन तो तिला रिंग मध्ये घेऊन गेला. गॅंथर तोपर्यंत तिथचं पडला होता. "थॅंक्स फॉर दि बेस्ट फाईट, यु डिझर्व दिस" असं गॅंथर अर्जुनला बोलला. अर्जुनेही त्याच्याशी हात मिळवला, आणि आपल्या खिलाडुवृत्तीचं दर्शन दिलं. त्यानं जिंकलेली ट्रॉफी त्यानं खान सरांच्या पायावर ठेवली. त्यांची छाती अभिमानानं फुलुन गेली. प्रत्येक जण त्याला विजयाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत होता. स्वराली अर्जुनचे ते कौतुक डोळे भरुन बघतं होती. कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर "पार्टी...पार्टी.." असं त्याचा ग्रुप त्याला म्हणु लागला. त्यानही आनंदाने पार्टी दिली.
No comments:
Post a Comment