Wednesday, April 18, 2012

कोल्हाट्याचं पोरं..!

              नमस्कार मित्रांनो, मनात आपण कधी कधी वास्तवाशी निगडीत असलेले शब्द लपवुन ठेवतो, आणि असेच काही वास्तव दर्शवणारे शब्द मी "कोल्हाट्याचं पोरं..!" या कवितेतुन मांडायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला ठाऊकच आहे की "कोल्हाट्याचं पोरं" हे आत्मवृत्त श्री. किशोर काळे यांची अजरामर अशी साहित्यकृती आहे, आपल्यापैकी कित्येकांनी ती वाचली असेलच, ज्यांनी ती वाचली नाही त्यांच्यासाठी ही कविता म्हणजे त्या पुस्तकाचं सार आहे असं मला वाटतं..! आशा करतो तुम्हाला कविता नक्की आवडेल..!

लावायला बापाचं नाव नव्हतं,
म्हणुन त्याने आईचं नाव लावलं होतं,
जन्मला नाही तोच नियतीनं,
अन्यायाचं गाठोडं त्याच्या डोक्यावर ठेवलं होतं..!


आईच्या दुधालाही त्याला मुकावं लागलं होतं;
जीवनाच्या तमाशानं त्याला आई पासुन दुर केलं होतं,
पतीच्या मर्जीखातरं तीनं तमाशाशी नातं तोडलं होतं,
"बाई..बाई..!" म्हणनारं तिचं लेकरु मागेच राहिलं होतं ..!


खाव्या लागल्या होत्या शिव्या, अंगावरही बसले फटके,
रक्ताच्याच नात्यानं का द्यावे त्या बालमनावर चटके?
दुसरा कोणी असता तर तो प्राणालाच असता मुकला,
अन्यायाच ओझ घेऊनच किशोर काळे जगला..


शिक्षणाचा त्याला मोठा आधार वाटत होता,
कारण शिक्षणच त्याच्या मुक्तीचा एकमेव मार्ग होता,
पण त्या मार्गावर चालतांना लागायची दरवेळी ठेच,
कारण शिक्षणासाठी सोडवायला लागायचा पैशांचा पेच..


जमलं असतं तर भडवेगिरीही करु शकत होता,
पण शिक्षणासाठी अन्याय सहन करायचा त्याचा मार्ग होता,
परिस्थितीवर मातं करुन तो चार बुक शिकला होता,
ज्या समाजानं दरदिवस जीवघेणा दिला,
त्याच समाजाला वाचवणारा तो डॉक्टर झाला होता..!


तरी त्याच्या प्राणावर ऊठणारा हा समाज आहे किती कठोर.?
अन्यायाचा सुमेरु ऊचलुन नियतीशी लढणारं ते होतं कोल्हाट्याचं पोरं..!
ते होतं कोल्हाट्याचं पोरं...कोल्हाट्याचं पोरं...!

1 comment: